TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 2 सप्टेंबर 2021 – मंत्रालयामध्ये अनेक वर्ष्यांपासून एकाच जागी काम करणाऱ्या ३०० अधिकाऱ्यांच्या बदल्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यात.

या बदल्या करण्यासाठी गेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न अपयशी ठरला. या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी मुख्यामंत्री ठाकरे यांना मुख्य सचिव सीताराम कुटे यांची मदत झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

मंत्रालयामध्ये एकाच ठिकाणी तळ ठोकून असलेल अधिकारी सचिवांपेक्षा अधिक धिकार गाजवत आहेत, अशी चर्चा मंत्रालयातील अधिकारी वर्तुळात होत होती. एकाच विभागात अधिकारी अधिककाळ असल्याने कॅबिनेट सदस्याना बदली करणे कठीण होते .

महाविकास आघाडी सत्तेत आल्यांनतर हि बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. यावर बराच काळ विचार करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मंत्रालयातील एकाच जागी वर्षानुवर्षे कामकारणाऱ्या ३०० अधिकाऱ्यांची बदली केली आहे.